पूर्वीच्या काळी नदीत पैसे (नाणी ) का टाकत ?

तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी अनेक लोक पाण्यामध्ये पैसे फेकताना दिसतील… पण असं का करतात बरं…याच्या मागचे कारण किती लोकांना माहीत आहे ? कधीतरी आपण रेल्वेने प्रवास करत असताना देखील आपले आई , बाबा , आजी , आजोबा यांच्यापैकी कोणी आपल्याला नाणी देऊन पाण्यात टाकायला सांगतात. खरतर सरकारला नाणी बनवण्यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागतात. मग आपण नाणी पाण्यात का टाकतो ?
पूर्वीच्या काळी पैसे नद्या, विशिंग वेल यांमध्ये फेकणं नशिबवान होण्याचा मार्ग मानला जात होता. पण पूर्वीच्या काळी तांब्याचे पैसे बनवले जायचे . आजच्या सारखे स्टील चे नाहीत .
कॉपर पाण्यात टाकल्यामुळे ते तुरटीसारखं काम करतात… त्यामुळे पाण्यात असलेला कचरा पाण्याखाली बसतो… त्यामुळे स्वच्छ पाणी पिण्यासाठी उपलब्ध होतं. तसंच कॉपर आपल्या शरीरासाठीही उपयोगी ठरतं… त्यामुळेच ही प्रथा पडली असावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu